infertilityayurved

Author name: infertility Ayurved

Home Remedies

मूळव्याध वर घरगुती उपाय

मूळव्याध वर घरगुती उपाय मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. होऊ नये म्हणून काय करायला हवेभरपूर पाणी, दररोज व्यायाम, शौचास जोर न करणे, एका जागी जास्त वेळ न बसणे, नेहमी वजनदार गोष्टी न उचलणे या गोष्टी पाळल्या तर मूळव्याध होणे टाळता येते. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेवणाच्या वेळा नियमित ठेवा, अतिरिक्त वजन कमी करा, मसालेदार पदार्थ, मांसाहार व अतियोग टाळा, मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, रात्रीचे जागरण टाळा म्हणजे मूळव्याधीपासून दूर राहता येईल. आहारात तंतूंचा भरपूर समावेश व मल नरम राहील अशी योजना आवश्‍यक असते. आहार :-हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.) रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. सुरणाची भाजी आठवड्यात एकदा तरी खावी,जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा. जेवणात तांदूळ, गहु,यव,ज्वारी,दूधी,पडवळ,आंबटचुका,घोसाळी,मुग,तुर,सुंठ, मनूका, आवळा याचा वापर करा. हे खाऊ नका मका,उडीद,वाल,पावटे,शेंगदाणे,तळलेले पदार्थ,लोणची ,पापड, मास विशेषतः बीफ रेड मीट सेवन टाळा.घरगुती उपाययोजना◆रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.◆इसबगोल सकाळी भीजत ठेवून रात्री ते पाणी प्यावे.◆कोरफड व लिंबू रस एकत्रित लावल्यास तात्काळ रक्त थांबेल.उपडे झोपून हे मिश्रण आत सरकवावे.◆कासिसादी तेलाचा बोळा भिजून या जागेत ठेवा.◆दोन चमचे दुर्वा रस कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.◆डाळींबाच्या सालीचे चुर्ण एक तास भीजत घालून नंतर ताक व जीरपूड+ सैधव घालून रोज प्या.◆मुळ्याच्या रसात लिंबू व सैधव घालून प्या.◆चमचाभर जीरेपूड, धनेपावडर, ओवा अर्क,बडीशेप अर्क चमचाभर व पिव्वर गुलकंद ग्लासभर पाण्यात घालून प्या.◆चमचाभर लोण्यात नागकेशर चुर्ण टाकून दोन-तीन वेळा घ्या.◆कोरफड गर व चमचाभर मध,चमचाभर दुर्वाचा रस व तूप,एरंडेल यांचे क्रीम तयार करुन त्या जागेवर लावा.वरती कापूस लावा.थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,म्हणजे छान मलम तयार होईल.◆मोड दुखत असेल तर,सुजला असेल,बाहेर आला असेल तर,विस्तवावर खारकेचे चुर्ण टाकून ती वाफ घ्या.मुळव्याध नियंत्रणासाठी अस्तित्वात असलेल्या उपचार पध्दती.◆मूळव्याधीच्या मुळाशी छेद घेऊन काढून टाकले जाते. यालाच हिमोरायडेक्‍टॉनी म्हणतात.◆मूळव्याधीचे कोंब स्टेपलर गनमध्ये घेऊन गन शूट केली जाते. या सर्जरीमध्ये मूळव्याध कट होण्याचे व स्टेपल होण्याचे कार्य एकाच वेळी होते.◆मूळव्याधीच्या ठिकाणी स्क्‍लेरोसंट इंजेक्‍शन टोचले जाते. वेदनाविरहित उपचार पद्धती आहे. रुग्णास ॲडमिट राहावे लागत नाही व मूळव्याधीमधील रक्तस्राव ट्रीटमेंटनंतर एक-दोन दिवसांत बंद होतो.◆डॉपलर गाइडेड हिमोराईड (मूळव्याध) आर्टरी (रक्तवाहिनी) लायगेशन (बांधणे) या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा बंद केला जातो.◆मूळव्याधीच्या कोंबावर लेझर किरणांचा मारा करून रक्तवाहिन्या गोठवल्या जातात. यामुळे मूळव्याधीमधील रक्तस्राव बंद होतो◆या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तस्राव बंद करण्यासाठी मूळव्याधीच्या कोंबांना नायट्रस ऑक्‍साइड वायूचा वापर करून गोठविले जाते यालाच फ्रायोसर्जरी असे म्हणतात.◆पाइल्स गनद्वारा मूळव्याधीच्या मुळाशी रबरबॅंड लायगेशन करुन रबरबँड बसविला जातो. मूळव्याधीच्या कोंबाचा रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते.◆मूळव्याधीच्या मुळाशी क्षारसूत्र बांधले जाते. या चिकित्सेमध्येही रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते. भगंदर या व्याधीमध्ये क्षारसूत्र चिकित्सेचा विशेष फायदा होतो. या उपचार पद्धतीनंतर भगंदर पुन्हा उद्‌भवण्याचे प्रमाण नगण्य आहे.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Home Remedies

वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी. *चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे. कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा. खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे. *सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे. *आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा. ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे. *तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा. भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही. नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते. * जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट, चॉकलेट इत्यादी बंद करावे. देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) , देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) , ताक (दुपारी जेवताना) घ्यावे. * ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको. *मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग, काळ्या मनुका (black resins), जर्दाळू (apricot),खारीक, लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे. *पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा. * ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे. नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे . *जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या. *आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते. पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत. सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Visit- https://infertilityayurved.in/  

blog

भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या!

भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या! मॅग्नेशियम सल्फेट यालाच सैंधव मीठ म्हणून ओळखले जाते. ते मीठ पाण्यात मिसळले असता मॅग्नेशियम आणि सल्फेट आयर्न सोडते. जे मानवी त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकते. याच्या 20 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 10 रुपये लागतात. सैंधव मिठाचे काही फायदे पुढीलप्रमाणे… शरीराच्या वेदनांपासून मुक्तता: भिजवलेल्या सैंधव मिठामुळे शरीर आणि सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. मॅग्नेशियममुळे शरीरात स्नायू सुखावतात. त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही अगदी बाथटब घेण्याची गरज नाही. सैंधव मीठ असलेल्या पाण्यात गुडघ्यापर्यंत पाय ठेऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधी आणि गुडघेदुखीचा त्रास जास्त असतो. तर 20 ते 30 या वयोगटातील तरुणांकडून चुकीच्या आहार पद्धतीमुळे हाडांच्या समस्या निर्माण होतात. विश्रांती आणि पुनर्प्राप्ती: अनेक अ‍ॅथलिट आपल्या प्रशिक्षणानंतर सेंधव मीठ घातलेल्या बाथ टबमध्ये बाथ घेतात. सैंधव मीठ सौंदर्य देणारे दाहक विरोधी आणि स्नायू शिथिल करणारे आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षणानंतर किंवा शस्त्रक्रियेमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना सैंधव मीठाच्या अंघोळीने वेदना कमी होतात. झोपेसाठी मदत करते: अनेक लोक झोपेपूर्वी सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ करतात. या लोकांना चांगली झोप लागते. दरम्यान त्यांना मिळालेल्या मॅग्नेशियममुळे निरोगी पातळी वाढते. उती, सांधे आणि स्नायू मध्ये थकवा कमी होतो. फिट असल्यास फायदेशीर: अनेक प्रौढांना किंवा लहान मुलांना फिट येण्याचा त्रास होतो. ज्यामध्ये सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने यात सुधारणा करण्यास मदत होते. डीटॉक्सीफिकेशन: हे मानवी शरीरासाठी महत्त्वाचे आहे. वजन कमी करणे, निरोगी राहणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे. यासाठी सैंधव मीठ यामुळे होणारे शरीराचे डीटॉक्सीफिकेशन फायदेशीर ठरते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी देखील सैंधव मिठाचा वापर करता येतो. शरीरातील आणि त्वचेतील पदार्थ बाहेर टाकण्यास सुरुवात होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 कप सेंधव मीठ घालून 15 ते 45 मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवल्यास फायदा होतो. ताण: मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो. स्नायू शिथिल होतात. त्यामुळे मेंदूला देखील आराम मिळतो. तर ताण तणाव कमी होतो. सैंधव मिठामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्याने शरीराला आराम मिळून ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सूज आणि दाह कमी होतो. शरीरात मॅग्नेशियममुळे स्नायु कार्यरत होतात. जसे हृदयाचे आरोग्य, रक्तदान, मेंदूचे आरोग्य, न्युरोट्रान्समीटर, न्यूरोलॉजिकल फंक्शन केस, त्वचा, यकृत, मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. सैंधव मिठाच्या अंघोळीमुळे पायाचा ताठपणा कमी होतो. सैंधव मिठामुळे शरीराला मिळणाऱ्या मॅग्नेशियम मुळे चयापचय क्रिया सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे असते. तसेच *व्हिटॅमिन D3 व्हिटॅमिन K2 * मिळाल्याने शरीर प्राप्त करते. सैंधव मीठ भिजवताना अशी काळजी घ्या : जर तुम्हाला कमी रक्तदाब असेल तर सैंधव मिठाचे पाणी वापरू नका. कारण यामुळे रक्तदाब कमी होतो. तसेच मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यास सैंधव मिठाचा वापर करू नये, मूत्रपिंड विषयी समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सैंधव मिठाचा वापर करा. अशा पद्धतीने सैंधव मीठ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अन्नाद्वारे किंवा आंघोळीद्वारे सैंधव मीठ घेणे कॅल्शियम मिळवण्यास मोठा स्रोत उपलब्ध करतो. @@@@आयुर्वेदिक तज्ञ@@@@: वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 हेल्पलाइन नं: 779677500094225585099822634478 Website : www.infertilityayurved.in 📚 👨‍⚕ जय आयुर्वेद अधिक माहीतीसाठी खालील Group Join करा. https://chat.whatsapp.com/H1AQ1UtiZO2ImLyeiECHXC Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Hair Fall Problem

बाल झड़ने की समस्या (Hair Fall Problem) और आयुर्वेदिक उपाय

बाल झड़ने की समस्या (Hair Fall Problem) और आयुर्वेदिक उपाय हर एक स्त्री या पुरुष को अपने अंदर की सौंदर्यता बहोत ही पसंद होती हैं । सर के बालों का घना होना,ये एक अच्छी Personality का एक प्रतीक माना जाता हैं। Bollywood मैं बहोत से Songs सर के सिल्की बालो पर निकले हैं। किंतु कई महिलाओं में बालों का झडना,बालों में सुका पन आना,बालों का पतला होना, बालों में Dandraff होना ये Complaints होती हैं। आजकल बाल झड़ना एक आम समस्या बनते जा रही है। लेकिन जब युवावस्था में बाल झड़ते है तो ये गंभीर समस्या बन सकती है और जब अधिक बाल टूटने लगें तो इससे गंजापन हो सकता है।  लेकिन आयुर्वेद में बालों से जुड़ी समस्‍याओं के लिए अनेक समाधान है, जो आपको मेहंगे से मेहंगे प्रोडक्‍ट लगाकर भी नहीं मिलेगा। आयुर्वेद में ऐसी कई जड़ी-बूटियां हैं, जो बेहद सस्‍ती हैं और बालों पर जादुई असर दिखाती हैं। आप इन्‍हें अपने बालों पर कई तरीके से उपयोग कर सकते हैं।   बाल झड़ने के कारन – बाल झड़ने के कई कारन हो सकते है जैसे की पर्यावरणीय प्रभाव, बढ़ती उम्र, तनाव, अत्यधिक धूम्रपान, पोषक तत्वों की कमी, हार्मोनल असंतुलन, अनुवांशिकता , ज्यादा केमिकलयुक्त उत्पादनों का इस्तेमाल, थायराइड विकार, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOD), लोहे की कमी से एनीमिया, और पुरानी बीमारियां, असंतुलित आहार, गलत जीवनशैली, दवाओं के दुष्प्रभाव ।  लंबी बीमारी या किसी बड़ी शल्य क्रिया या सर्जरी, गंभीर संक्रमण या इंफेक्शन और शारीरिक तनाव से दो या तीन महीने के बाद बालों का झड़ना एक सामान्य प्रक्रिया है। हार्मोन स्तर में आकस्मिक बदलाव के बाद भी ये हो सकता है, विशेषकर स्त्रियों में शिशु को जन्म देने के बाद यह होता है। किसी बीमारी के लक्षण के रूप में भी बालों का झड़ना हो सकता है जैसे कि थायरॉयड, सेक्स हार्मोन में असंतुलन या गंभीर पोषाहार समस्या विशेषकर प्रोटीन, जिंक, बायोटीन की कमी। यह कमी खान-पान में परहेज करने वाले और महिलाओं में मासिक धर्म में बहुत ज्यादा रक्तस्राव होने पर होता है। इसके अलावा बाल झड़ने के और भी कारन हो सकते है जैसे की – Hair Oilबिलकुलना लगाना Excess Use of HairShampoo केमिकलवाले Hair Dye करना हरदिन Hair wash करना Calciumकीकमी,Vit B12 की कमी Scalp Infection शरीरमें हार्मोन्स का बदलाव ( Androgen,Thyroid etc) रातमें निंद की पुरी ना होना ( Night Duties ) Drugs -ब्लडथिनर,कॅन्सर उपचार की दवाए,जन्म नियंत्रण दवा, बीटा ब्लॉकर्स के कारण बाल गिरते हैं|   आयुर्वेदिक उपाय – आयुर्वेद में हेयर फॉल (Hair Fall) को रोकने के लिए कई उपाय बताये गए है। हम अगर अपने जीवनशैली में बदलाव करे तो हेयर फॉल (Hair Fall) आसानी से रोका जा सकता है। जैसे-जंक फूड का सेवन न करके फल एवं सब्जियों का अधिक सेवन करें। बाल झड़ने की समस्या से बचने के लिए खान-पान के साथ एक अच्छी जीवन शैली को अपनाना भी जरुरी है। तनाव कम कर, उचित आहार लेकर, बाल संवारने की उचित तकनीक अपनाकर और यदि संभव हो तो बालों को झड़ने से रोकने वाली दवाइयों का उपयोग कर बालों के झड़ने की समस्या को रोका (hair fall control) जा सकता है। दवाइयों की सहायता से वंशानुगत गंजेपन के कुछ मामलों को रोका जा सकता है। स्त्रियों में गर्भावस्था के दौरान अथवा मेनोपॉज के बाद बाल झड़ने की समस्या देखी जाती है इसके लिए भी संतुलित आहार एवं तनावरहित जीवन शैली बाल झड़ने के उपाय की आवश्यकता है। जीवनशैली में बदलाव लाने पर बालों का झड़ना कुछ हद तक रोका जा सकता है। हेयर फॉल (Hair Fall) के लिए आयुर्वेदिक उपाय – Vit Aकीजरूरत हम पशु उत्पादन जैसे दुध,अंडे और कॉड लिव्हर ऑइल से पा सकते हैं।Vit Bकीजरूरत हम सभी प्रकार के अनाज,बादाम,मांस,समुद्री भोजन, हरी पत्तेदार सब्जीयों में पा सकते हैं।Vit Dकीजरूरत हम मशरूम, मछली, कॉड लिव्हर ऑइल,अंडे इनसे पा सकते हैं।आमला-इसमेंबालों की वृद्धी के लिए सबसे पोषक तत्व हैं।एलोवेरा – यह का बालों की वृद्धी के लिए पोषक हैं।माका- भृंगराज ( माका) यह बालों को घना बनाता हैं।Hair oil -हररात सोते समय Hair oil हलका सा गरम करके बालों के जड को मसाज करता हैं। निलीभृंग्यादी ऑइल, महाभृंगराज तेल इ.शिकेकाई+ रिठा एक साथ Mix करके रात में भिगोके रखना हैं।सुबह Hair wash करना हैं।Hair Washहप्तेमें 2 बार !! !!!!!Ayurveda is the Best Option for Healthy Hairs!!!!! हेल्पलाइन नं* : 7796775000/ 9422558509/ 9822634478 Website : www.infertilityayurved.in डॉ. अविनाश देवरे. डॉ. विद्या देवरे. M.D.(Ayu). कोहिनुर आर्केड ,१ Floor , शॉप नं 116, टिळक चौक,मुंबई-पुणे रोड,निगडी पुणे-411044 Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात. च्यवनप्राश हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा. च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे. आवळा हे एक उत्तम प्रकारचे व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे औषध आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते. त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी व तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया च्यवनप्राशचे खाण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत व त्याचे सेवन कसे करावे: च्यवनप्राश सेवन करण्याचे काही नियम: बरेच वेळी लोकांचा गैरसमज असतो कि च्यवनप्राश केवळ हिवाळ्यामध्ये सेवन करावे. परंतु, आयुर्वेदामध्ये याला संपूर्ण वर्षभर सेवन करण्याच्या सल्ला दिला गेला आहे. 5 वर्षाखालील मुलांना पाव चमचा, 10 वर्षाखालील मुलांना अर्धा चमचा व त्यानंतर 1 चमचा याप्रमाणे च्यवनप्राश दररोज सेवन करावे. वयाच्या पस्तिशीनंतर त्यात चांदी, सुवर्ण अशी द्रव्ये मिसळून तयार केलेले च्यवनप्राश सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील याचे सेवन करावे. त्यामुळे मुलांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होते. परंतु च्यवनप्राश तुपासोबत घेऊ नये. कारण तूप हा च्यवनप्राश चा एक घटक आहे. त्यामुळे तुपासोबत घेतल्याने वजनवाढीची समस्या उद्भवू शकते. च्यवनप्राश कोणत्या वेळी सेवन करावे? आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश व कोणतेही आयुर्वेदिक औषध सकाळी घेणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर च्यवनप्राश सकाळी रिकामे पोटी खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यापूर्वी एक चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेतल्याने याचा चांगला फायदा होतो. तसेच झोपण्यापूर्वीदेखील आपण १ चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेऊ शकतो. च्यवनप्राश सेवन करण्याचे फायदे: ह्यातVit A आणि Vit C चे प्रमाण असते . ह्याचे सेवन केल्याने प्राणवह स्रोतसांचे (फुफ्फुसांचे) रोग दूर ठेवण्यास मदत होते( जसे – सर्दी, खोकला) च्यवनप्राशसेवन केल्याने व्याधीक्षमत्व वाढते. (Immunity Booster.) रोजसेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यास मदत करते. ह्याच्या सेवनाने तारुण्य टिकवण्यासाठी मदत होते.(Anti Ageing). बुद्धीवर्धक असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. Tonic for reproductive System. परीपुर्णशारीरीक वाढीसाठी उपयुक्त. श्वसनाच्यासमस्या कमी करते रोगप्रतिकारशक्तीसुधारते स्त्रियांमध्येमासिक पाळीच्या समस्या दूर करते व पाळी नियमित करण्यासाठी मदत करते. ब्लडप्रेशर नियंत्रित करते रक्तशुद्ध करते, हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते कोलेस्ट्रॉलनियंत्रित करते 😃स्वस्थ रहा मस्त रहा😃 अशाच उपयोगी माहीतीसाठी संपर्क करा – 7796775000 डॉ. अविनाश देवरे श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक पत्ता : कोहिनुर आर्केड ,१ मजला , शॉप नं ११६ टिळक चौक , निगडी पुणे-४४ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

Ayurvedic Treatment for Irregular Periods (PCOD)

PCOD (Polycystic ovarian disease): In India amongst every 10 women, there is one suffering from PCOD and it is most common in the case of teenagers. What is PCOD?         PCOD is a condition of irregular periods occurring in women which is related to the ovaries. From the moment when a female starts having a menstrual cycle i.e. from the age of 12 up to the stage of menopause i.e. at the stage of 50, every month ovum is released in the ovaries of a female. Sometimes due to improper/reduced growth, the ovum is left away in the ovary in the form of a cyst. Due to such repeated action, many cyst-like structures are collected in the ovaries which causes the ovary to swell. This also causes painful menses.   In order to have a regular menstrual cycle, the growth of the ovum on time and its release after that is very much required, or else due to the improper growth of the ovum, it is more likely to not get pregnant and have an irregular menstrual cycle. This is what is known as P.C.O.D [Polycystic ovarian disease ].          Due to this disease feminism starts reducing whereas there is an increase in male hormones, which leads to the irregular menstrual cycle. In some cases, the occurrence of the menstrual cycle depends completely on medication whereas during the menstrual cycle there is an increased or reduced flow of blood. Following are some common symptoms of PCOD:           Irregular periods are the most common symptom of PCOD. PCOD may also lead to dryness of skin, darkness in the skin, getting dark spots on the skin, the occurrence of pimples or acne on the face as well as body, increased weight at a higher rate, hair fall or split ends. Some women may have unwanted hair growth on the chin, upper lips, limbs, stomach, boredom, irritation, depression. Some women also experience ineffectiveness of exercise as well as medication used for reducing weight etc. and such symptoms are caused due to imbalance of female hormones. Causes of PCOD:              The exact cause of PCOD is unknown. But some of the factors responsible for it include – present western lifestyle, where there is lack of exercise, irregular meals, high intake of fast food /junk food, waking up late, late-night sleeping habits, high carrier orientation, mental stress, etc. which cause an increase in the male hormones/hormonal imbalance and ultimately irregular periods.  Ayurvedic Treatment of PCOD:                   Hence while treating this disease it is required to follow the rules set by mother nature and maintain the balance of seven tissues [sapta dhatus]. The treatment for strengthening the uterus and increasing the efficiency of tissues along with physical exercise for improved physical and mental efficiency is very helpful in treating P.C.O.D          Other forms of treatment are temporary and more focused on medication for the immediate occurrence of the menstrual cycle. With the use of Ayurvedic medication, the menstrual cycle is regularized and it may also be helpful for a person to get rid of infertility naturally thereby leading to pregnancy due to the formation of the ovum. Ayurvedic diet and activities for PCOD     A strict diet routine has to be followed during the entire treatment of PCOD since many physiological systems are impaired in this condition. Do’s 1) Exercise regularly 2) Include vegetables like bitter guard and drumsticks in the diet. 3) Check blood glucose level pre & post-lunch. 4) Drink at least 8 – 10 glasses of water daily. 5) Take proper rest. Dont’s 1) Avoid alcohol consumption and smoking. 2) Avoid Black gram, sour items, chilies, and salted food items. 2) Avoid refrigerated/chilled food. 3) Avoid caffeine and alcohol. 4) Avoid daytime sleep as it may worsen the PCOD situation. 5) Avoid milk and milk products, particularly yogurt, curd, and buttermilk. 6) Avoid fish and jaggery. PCOD Treatment at Shree Sai Ayurvedic Clinic:         Shree Sai Ayurvedic Clinic is a renowned Infertility Clinic in PCMC. Since body and mind together are interdependent, Ayurveda considers it as a single unit in the treatment process. At our clinic in PCMC, we provide Ayurvedic medicines for PCOD And All Other treatments which are 100% herbal. The aim of treatment is to correct the hormonal imbalance. Every treatment procedure or medicine will be prescribed only after taking into consideration each complaint presented by the patient such as diabetes, obesity, etc. The treatment includes Panchakarma techniques such as Vaman, Virechan, Basthi/Uttar Basthi, Shirodhara, and Nasya depending on severity and patient’s requirement. For more information about PCOD contact us – 7796775000 Dr. Avinash Deore Shree Sai Ayurvedic Clinic Address: Kohinoor Arcade, Shop No. – 116, First Floor, Tilak Chowk, Mumbai Pune Road, Nigdi, Pune, Maharashtra 411044 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते. परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो. तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते.  आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन  साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया,  कावीळ, कॉलरा. तसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्प्लपित्त यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात. योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते. या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे, काय खावे, कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये  ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील  आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियांचे कसे संरक्षण करावे. हे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी. पावसाळ्यातपाणी उकळून प्यावे पालेभाज्या,फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. रस्त्यावरीलउघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत दूषितहवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ, संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळाचा धूर करावा. पावसाळ्यामध्येलहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. अतिसार, मलेरिया, गोवर, कांजिण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये वाढलेले दिसते.  हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सितोपलादी चूर्ण, अरविंदासव, महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत. हे लक्षात ठेवा दररोजसर्वांगाला तिळाचे तेल  कोमट करून मसाज करणे, व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे. गाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्याततळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न,  फास्ट फूड  आरोग्यास हानिकारक आहेत. फ्रिजमधीलअतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात. गुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. उदा. दूध + फळे एकत्र, मिल्कशेक, दूध व मासे एकत्र, मांसाहारानंतर आईस क्रीम. गरमपाणी व मध एकत्र पिऊ नये. दररोजरात्री झोपताना १५ ते २० काळ्या मनुका खाल्ल्याने पोट साफ होते. रात्रीझोपताना कोमट पाणी प्यावे. यामुळे वजन नियंत्रित राहते व शरीर हलके राहते. सांधेदुखी,वातव्याधी टाळण्यासाठी महानारायण तेलाने मालिश करावे निरोगीराहण्यासाठी व शरीरातील वाढलेला वात कमी करण्यासाठी आयुर्वेद वैद्याकडून बस्ती हे पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यातजठराग्नी मंद झाल्याने भूक कमी होते. त्यामुळे जेवण कमी जाते व अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडते.  ही  गोष्ट टाळण्यासाठी सुंठ घालून पाणी उकळून प्यावे. दैनंदिनआहारामध्ये पचनाला हलके अन्नपदार्थ घ्यावेत. अशापद्धतीने आयुर्वेदातील सोपे नियम पाळून आपण अनेक अवघड आजारांपासून लांब राहू शकतो. पावसाळा खरंच आनंदाचा अनुभव देणारा ऋतू असतो. त्यामुळे वरील काही पथ्ये पाळा व पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्या. आपल्या खानपानाच्या सवयींनवर नियंत्रण ठेवा.  आजारी पडण्यापेक्षा आजारांची पूर्वतयारी केलेली केव्हाही उत्तमच. आणि जर आजारी पडलाच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार त्वरित करावा. अशाच उपयोगी माहीतीसाठी  संपर्क करा – 7796775000 डॉ. सौ. विद्या देवरे श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक पत्ता : कोहिनुर आर्केड ,१ मजला , शॉप नं ११६ टिळक चौक , निगडी पुणे-४४ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक समस्याही महिलांना असतात. मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात जसे कि स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, इ. त्रास होतात.  ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. पाळीच्या आधी 1-2 आठवडे हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. आणखी एक प्रकार म्हणजे पाळी सुरु झाल्याझाल्या ओटीपोटात दुखून येते.  हे दुखणे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीच्या 3 – 4  दिवसांत हा त्रास चालूच राहतो. परंतु काही पथ्य पाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो आणि आपणास आराम मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ मासिक पाळी दरम्यान काळजी  घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स. तीन ते पाच दिवस रक्‍तस्राव सुरू असणाऱ्या स्त्रीला रज:स्वला असे म्हणतात. या काळामध्ये योनीमार्गातुन रक्तस्त्राव होतो. शारीरिक व मानसिक थकवा असतो.  अशा वेळेस समागम केल्यास जास्त वेदना होतात व आरोग्याच्या दृष्टीने हे त्रासदायक ही असते. या काळात विश्रांती मिळावी म्हणून पुर्वीच्या काळी स्त्रियांना बाजूला बसवले जायचे.  परंतु आज स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, तिला बाजूला बसणे शक्य नाही म्हणून त्रास होतो. पाळीमध्ये उद्भवणारे  काही दोष व त्यांचा परिणाम: या काळात गर्भाशय आकुंचन पावल्यामुळे किंचित वेदना होतात. आयुर्वेदामध्येवातप्रकृतीच्या स्त्रियांमध्ये रक्तस्राव अगदी कमी व काळपट रंगाचा व वेदनायुक्त असतो. पित्तप्रकृतीमध्ये जास्त प्रमाणात लालभडक रंगाचा, वेदनारहित असतो. तरकफप्रकृतीमध्ये लाल रंगाचा, कफयुक्त, थोडासा बुळबुळीत, मध्यम प्रमाणात व वेदनारहित असतो. पाळीमध्ये कोणता आहार घ्यावा? पाळीमध्ये पाचन अग्नि नैसर्गिकरित्या कमी होते, म्हणून स्त्रियांसाठी या काळात विशिष्ट प्रकारच्या आहाराचे अनुसरण करणे महत्वाचे आहे.  या कालावधीमध्ये आहार कसा असावा याबद्दल आयुर्वेदामध्ये काही पथ्ये सांगितलेली आहेत. त्यात असे सांगितलेले आहे कि स्त्रियांनी या काळात पचायला हलके, गरम व शिजवलेले अन्न खावे.  कारण पचायला जड, थंड आणि कच्चे पदार्थ वात डोश वाढवू शकतात. चला तर जाणून घेऊ काही आयुर्वेदिक टिप्स : पाळीसुरूअसताना आहार हलका व नेहमी पेक्षा कमी प्रमाणात घ्यावा. तेलकट तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. या दिवसात शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते. आहार जास्त घेतला तर त्याचे पचन व्यवस्थित होत नाही.  अपचनामुळे शरीरातील आम निर्मिती होऊन बरेच आजार जडतात, म्हणून शरीराला उत्साह व बळ मिळेल असा हलका आहार घ्यावा.  भाज्यांचे सूप, शहाळ्याचे पाणी,संत्री,मोसंबी अशा प्रकारच्या फळांचे रस तसेच नाचणीची पेज घ्यावी. शक्यतोजेवणताजे व गरम असावे. पालक,  माठ, चाकवत, राजगिरा भाज्या खाव्यात. टोमॅटो,गाजर यांची कोशिंबीर व जीवनसत्वे प्रोटीन युक्त आहार घ्यावा. दूध, कडधान्य ,फळे, भाज्या यांचा समावेश असावा. वेदनाकमी करण्यासाठी अजवाईन  गरम किंवा कोमट पाण्यामध्ये  घ्या. तसेचया काळात कोमट  पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होऊन मासिक पाळी व्यवस्थित होण्यास मदत करते, पचन सामान्य ठेवते, तसेच भूक आणि चव सुधारते.  त्यामुळे शक्यतो कोमट पाणी प्यावे. आहारातकाही प्रमाणात तुपाचा समावेश करावा. ते पचनास मदत करते, अपान वात खालच्या दिशेने राखते त्यामुळे उदरपोकळी कमी होऊन मासिक पाळी येण्यास मदत होते.  तसेच तूप हे आपले मन शांत करते म्हणून आयुर्वेदामध्ये तूप दररोज सेवन करण्याची शिफारस केली जाते.  तसेच महिलांमध्ये  दररोज आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्याने तणाव, चिंता, मनःस्थिती बदलणे, भीती इत्यादीपासून मुक्त होतो आहारात दूध, जव असा आहार घ्यावा. पाळीमध्ये आचरण कसे करावे? पाळीमध्ये स्त्रियांनी कसे आचरण करावे यासंबंधी काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊ त्या काय आहेत: स्त्रीनेयापाच दिवसांमध्ये आपले मन प्रसन्न ठेवावे. सकारात्मक विचारांमध्ये मन गुंतवावे. शोककरणे,रडणे, अति श्रमाची कामे टाळावीत. कारण अधिक श्रमामुळे रक्तस्रावाचे प्रमाण वाढते व थकवा येतो. दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे कफ वाढून स्त्रोतसा मध्ये अडथळा निर्माण होतो. अनेक आजार जडतात. शरीराची स्वच्छता राखावी. सकाळी आंघोळ करावी व दर तीन ते चार तासांनी पॅड बदलत राहावे. स्त्रियांनीया काळात अधिक श्रम करू नये. तसेच अधिक  वजन उचलू नये. खेळणे, धावणे,  पोहणे इत्यादी क्रिया करू नये. शक्य तेवढा आराम करावा. पाळीच्याजागेची स्वच्छता ठेवावी. रोजकोमट पाण्याने स्नान करावे व  स्नान करताना कंबर, पाळीची जागा गरम पाण्याने शेकावी. अंगजास्त चोळू नये त्यामुळे रज स्रावचे प्रमाण कमी होते. चौथ्यादिवशी डोक्यावरून स्नान करावे. शुभ्रवस्त्र परिधान करावे. अलंकारधारण करावे. ही परिचर्या पाळल्यास महीलांमध्ये पाळीच्या तक्रारी होत नाहीत.व नकोशी असणारी पाळी आपलीशी वाटायला लागते. अशाच उपयोगी माहीतीसाठी  Group Join करा. https://chat.whatsapp.com/IZ2vZ3wHhQO4rrLQ3jYbOC डॉ. अविनाश देवरे श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक पत्ता : कोहिनुर आर्केड ,१ मजला , शॉप नं ११६ टिळक चौक , निगडी पुणे-४४ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Scroll to Top