infertilityayurved

Author name: infertility Ayurved

blog, Uncategorized

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे)

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) तिल कफ और पित्त को कम करने में मदद करता है।तिल शरीर को मजबूत बनाते हैं और बालों के लिए बहुत फायदेमंद होते हैं। * तिल त्वचा के स्वास्थ्य के लिए अच्छे होते हैं, शरीर में कहीं भी अल्सर के लिए फायदेमंद होते हैं, दांतों के लिए अच्छे होते हैं, भूक और दिमाग की शक्ति बढानेवाला है * आयुर्वेद में तिल का उपयोग विभिन्न तरीकों से किया जाता है। सभी प्रकार के तेलों में तिल के तेल का उपयोग देखा जाता है। यह सिद्ध हो चुका है कि तिल का तेल न केवल अभ्यंग के लिए उपयोगी है, बल्कि इसे अन्य उपचारों जैसे कि बस्ती, शिरोबस्ती आदि के लिए भी अनुशंसित किया जाता है। * कई लोगों का अनुभव है कि बवासीर से पीड़ित व्यक्ति यदि तिल को पानी में भिगोकर उससे बने पेस्ट में मक्खन मिलाकर भोजन से पहले 2-3 दिन तक सेवन करें तो रक्तस्राव बंद हो जाता है।  – तिल को बालों के स्वास्थ्य के लिए अच्छा माना जाता है। ऐसा कहा जाता है कि अगर बालों में काले तिल का तेल लगाया जाए तो वे समय से पहले सफेद नहीं होते, बल्कि काले, घने और मुलायम बने रहते हैं। * सम्पूर्ण स्वास्थ्य के लिए तिल हमेशा आपके रसोईघर में होने चाहिए। मसालों में प्याज और लहसुन का उपयोग करने की अपेक्षा तिल को विभिन्न बीजों के साथ उपयोग करना भी बेहतर है। -पिसे हुए तिल, भुना हुआ सूखा नारियल, करी पत्ता, सूखी लाल मिर्च आदि से बनी तिल की चटनी खाना उत्तम है| इस मौसम में नियमित रूप से तिल के लड्डू और तिल की चिक्की खाना भी अच्छा होता है  तिल के लड्डू शरीर को कैल्शियम और आयरन से भर देते हैं और सर्दियों में शरीर को समग्र शक्ति प्रदान करने तथा गर्म रखने में मदद करते हैं।  ऐसे गुणयुक्त तिल खाए और स्वास्थ्य का लाभ उठाए तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44  श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.    हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ?

How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? दिवाळी हा गोडधोड पदार्थांचा सण असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण कोणताही विचार न करता, तेलकट किंवा गोड पदार्थ बिनधास्त खाताना दिसतात. पण, दिवाळीनंतर मात्र हेच लोक वजन वाढल्यामुळे चिंताग्रस्त होतात. दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आपण बघूया. आहारतज्ज्ञ सांगतात, “दररोज अतिरेकी प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले, तर वजन नक्की वाढू शकतं. तेलकट पदार्थदेखील जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं. दिवाळीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मुळात ते कशामुळे वाढलं हे समजून घेणं गरजेचं आहे.जर फक्त फराळ खाण्यामुळे आणि अतिरिक्त खाण्यामुळे वजन वाढलं असेल, तर पुन्हा योग्य प्रमाणात जितका आवश्यक आहे तितका आहार घेण्यास सुरुवात करावी.” “आहाराचं नियोजन करताना तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाऊ शकता”. तुम्हाला या नियेजनाचा नेहमीच फायदा होऊ शकतो. व्यायाम आणि आहार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त डाएट करीन आणि वजन कमी होईल किंवा मी फक्त व्यायाम करेन आणि आहाराकडे लक्ष देणार नाही, असं म्हणूनसुद्धा चालत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या लागतात; पण लक्षात घ्या अतिव्यायाम, खूप जास्त आहार, अतिपथ्य या बाबीही हानिकारक आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किमान एक तास व्यायाम आणि उत्तम आहार नियोजन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. “वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं कधीही फायदेशीर ठरत नाही. ज्या वेळेला आपण कर्बोदकं, प्रथिनं व स्निग्धांश यांचा विचार करतो. त्यावेळी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, एकाच वेळी जेवण केल्यामुळे कधी कधी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात पोषक घटक मिळू शकतात; त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी आरोग्याचं नुकसान जास्त होतं.” गोड खाणं अचानक बंद केल्यानंतर नक्की मदत होते. मुळात गोड खाणं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही पांढरी साखर पूर्णपणे वर्ज्य केलीत, तर तुमच्या शरीरामध्ये फक्त चांगलेच परिणाम दिसून येतील. असं केल्यानं तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. त्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्याशिवाय तुमची विचार करण्याची पद्धत सुधारते, दातांचं आरोग्य उत्तम होतं, केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं, तुम्हाला व्यायाम करण्याची ऊर्जा मिळते आणि तुम्हाला व्यायाम करावासा वाटतो. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे आता गोड पदार्थांपेक्षा तुम्ही स्निग्ध पदार्थांकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. गोड खाणं बंद केल्यानंतर दुष्परिणाम अजिबात होत नाहीत. कारण- ज्या वेळेला तुम्ही साखर बंद करता, त्या वेळेला भारतीय आहाराप्रमाणे जर बघायला गेलं तर तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कर्बोदकं असतात आणि त्यामुळे त्यातून मिळणारी साखर ही तुमच्या शरीराला पूरक आणि पोषक असते. “जर तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर पहिल्यांदा तुमची रक्त तपासणी करून घ्या. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या न्युट्रियंट्सची कमतरता आहे का, हे जाणून घ्या. जर तुम्ही कमी कॅलरीज खात असाल, तर त्यामुळेही तुम्हाला सतत गोड खावेसं वाटू शकतं आणि मुख्यत्वे गोड खाल्ल्यानंतर तुमचे हॅपी हार्मोनसुद्धा उत्तेजित होतात. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं खूप चांगलं वाटतं,” असे सांगतात.  “गोड खाण्याच्या बाबतीत तुम्ही मनावर ताबा ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि गोड खाण्याचं प्रमाण कमी असणं देखील तितकंच गरजेचं आहे.” https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44  श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.    हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी महिला आणि आरोग्य

blog

LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) 1. What is AMH? AMH is an anti-mullerian hormone. It is a protein hormone made by the cells lining the follicles(sacs that hold the eggs) in females & the testicles( or testes) in males.AMH is an important hormone for the sexual development of both males & females & plays different roles in both genders. A good AMH level for pregnancy is between 1.0 and 4.0ng/ml. 2. What is low AMH & high AMH? LOW AMH: Low AMH & pregnancy are often discussed simultaneously. This is because low AMH levels signify a decreased or very low number of eggs in the ovarian reserve. HIGH AMH: High levels of AMH mean more antral follicles & a higher yield of oocytes during ovarian stimulation which can ultimately lead to the formation of more embryos. An important thing to remember here is that AMH is only a market of the number of eggs & not their quality which is more important in forming good-quality embryos & ultimately a successful pregnancy. 3. Causes of low AMH & high & AMH? LOW AMH CAUSES:There are various factors affecting the AMH level in a woman’s ovaries :a) Stress levelb) Age factorc) Vitamin deficiency (especially vit d )d) Eating habitse) Birth control pills HIGH AMH CAUSES :A lack of sensitivity to injection FSH: if someone’s ovaries don’t respond well to follicles stimulating hormone( FSH) which helps eggs grow & mature. AYURVEDIC TREATMENT : 1. Pushpadhanva rasa (250mg): before lunch & before dinner.2. Suvarna Malini Vasant rasa(gold) 125 mg:1 tab in the morning empty stomach with warm milk.3. Tapyadi loha with rajat (bhasma)125mg :1 tablet after lunch & 1 tab after dinner. PANCHAKARMA THERAPIES IN LOW AMH: 1. UTTRABASTI with phalasarpi ghrit using 1.5cc syringe for 3 days in each cycle continue upto6 to 8 months.2. VIRECHAN KARMA:A) Ghrutapan with Ashok Ghrita followed by 5 to 6 days.B) Sarvang snehan swedan for 3 to 4 days.C) Virechana dravyas withichhabhedi rasa or Trivrutta avaleha.3. YOG BASTI:To be done for 8 dasy followed by sarvang snehan swedan with alternate day Anuvasan & Niruh Basti.Anuvasan basti with saptabhavit ksheerbala oil, Niruh basti with Dashmool+ prajasthapan gana sidda qwath.4. NASYA KARMA:With shatavari ghrita in morning empty stomach. LIFESTYLE MANAGEMENT: 1. STRESS MANAGEMENT: It’s important to manage stress through meditation, exercise &therapies to help improve fertility health & potentially improve AMH levels.2. ADEQUATE SLEEP: Ensure you get at least 7-8 hours of sleep each night lack of sleep can lead to hormonal imbalance.3. HEALTHY DIET: Adopt a healthy diet following a healthy diet can help to improve your ovarian reserve you can include the following things- fresh fruits, vegetables, nuts, whole grains, eat organic, reduce refined carbs, avoid processed foods, limit sugar intake, avoid packaged food, etc.4. MAINTAIN HEALTHY WEIGHT: Your weight influences your AMH level so keep it in a healthy range.5. Avoid smoking and Excessive Alcohol: Smoking and Excessive Alcohol consumption may harm fertility, so it’s advisable to avoid or limit these substances. A. What should you eat or include in your diet? 1. Adopt a healthy Diet.2. Fresh fruits and vegetables3. Nuts, Whole grains.4. Eat Organic.5. Beans & lentils, Seeds, Dry fruits, etc…6. Green Leafy vegetables. B. What to avoid? 1. Reduced refined carbs.2. Avoid processed food.3. Limit Sugar intake.4. Avoid Packaged food5. Ready to eat food. EFFECTS OF ALCOHOL AND SMOKING ON FERTILITY. 1. From disrupting hormone production to impairing sperm quality and motility. Smoking can make it difficult to initiate the process essential four successful conception.2. Hormonal Imbalance: Prolonged alcohol/smoking consumption disrupts the delicate balance of hormones crucial for reproductive function3. Drinking alcohol targets sperm. morphology & sperm producion.4. Smoking releases toxins that primarily hamper sperm mobility and seminal fluid quality and affect or cause Brechile dysfunction.5. Alcohol-induced oxidative stress can damage. Sperm DNA, altering their morphology & Increasing the likelihood of genetic abnormalities. in offspring. WE HAVE MORE THAN 2000 CASES SUCCESSFUL OF LOW AMH. Patient Testimonials https://youtu.be/-kgyHbOeOAYhttps://youtu.be/6zNwCI-_0HQ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

blog

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) नवरात्री हा एक धार्मिक उत्सव असून तो देवी दुर्गेच्या ९ रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. या काळात देवीच्या पुजेबरोबरच भक्तजन उपवास करुन देवीची आराधना करतात. आयुर्वेदानुसार, नवरात्रीमध्ये उपवास करण्याला बरेच महत्त्व आहे. कारण यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारते. नवरात्री ही देवी शक्तीची आराधना करताना आपलं शारीरिक बल वाढावं म्हणून उपवास योग्य पद्धतीने करायला हवा. (Navratri Fasting importance in ayurveda). या काळात, पाच तत्त्वांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. म्हणूनच नवरात्रीच्या दरम्यान, ताज्या फळांचा, शुद्ध धान्यांचा आणि भारतीय मसाल्यांचा उपयोग करुन उपवास केले जातात. हे पदार्थ शरीराची क्षमता वाढवतात आणि शक्ती देतात. याबरोबरच नवरात्रीमध्ये ध्यान केल्याने मनाची शुद्धता साधता येते. ध्यानाच्या माध्यमातून आंतरीक शांती प्राप्त करतात, ज्यामुळे आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागरूकता वाढते. ध्यानामुळे आत्मसंयम साधता येतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते. उपवासामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीरातील आत्मरक्षण शक्ती वाढते. उपवासाच्या काळात हलका आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये फळे, शेंगदाणे आणि शुद्ध धान्य यांचा समावेश असतो. हे आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार उत्तम मानले जाते. या काळात केल्या जाणाऱ्या उपवासामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो, ज्यामुळे ध्यानाची शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांतून मिळेल ऊर्जा 1. राजगिरा पिठ: हे पित्त आणि वात संतुलित करण्यास मदत करते. 2. सामक तांदूळ (वरई): यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्व असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते. 3. सिंगा (शिंगाडा): हायड्रेटिंग गुणधर्मामुळे, हे शरीरात ताजेपणा आणते. 4. फळे: सफरचंद, केळी, पेरु आणि मोसंबी यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. लंघनाचे महत्त्व- आयुर्वेदात लंघन म्हणजे उपवास करणे किंवा हलका आहार घेणे. लंघनामुळे शरीरातील पचनक्रिया आणि विषाक्त पदार्थांचे शुद्धीकरण साधता येते. लंघनामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. लंघन हे आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण यामुळे आहाराच्या आवडीनिवडीवर नियंत्रण ठेवता येते. लंघनाचे फायदे – 1. पचन सुधारते – पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. 2. विषाक्त पदार्थांचा नाश – शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. 3. ऊर्जा आणि चैतन्य वाढवते – शरीराला ऊर्जा मिळते व ताजेतवानेपणा येतो. 4. रोग निवारण – लंघनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण होते. https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

blog

Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore चिकनगुनिया पावसाळ्यात साथीचे आजार होतात, सध्या सगळी कडे व्हायरल तापाची साथ सुरु आहे, तिच्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ.चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप (temperature) आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले. चिकनगुनिया हा काही जास्त मोठा आजार नाही किंवा तो नीट होणारच नाही असे देखील नाही. याचे अनेक असे उपाय आहेत ज्यामुळे हा आजार ठीक होऊ शकतो. कुठलाच आजार मोठा नसतो फक्त आपले सकारात्मक विचार आणि त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद या दोनच गोष्टी आपल्याला आजार पळवून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. चिकनगुनियाची कारणे (Chikungunya Causes) या आजाराचे मुख्य कारण पहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात. यामध्ये हजारो डास तयार झालेले असतात, त्यामधील काही अतिशय विषारी असतात. चिकनगुनिया हा आजार वेळेस एडेस एलबोपिक्टस (Aedes Albopictus) तसेच एडेस इज्यप्ती (Aedes Aegypti) नावाच्या मच्छरने चावल्यास होतो. हा व्हायरस मुख्यता जनावरांमध्ये किंवा पक्षांमध्ये असतो व तिथूनच आजूबाजूच्या परिसरात पसरतो. चिकनगुनिया ची लक्षणे (Symptoms of Chikungunya) चिकनगुनिया मध्ये एक विशिष्ट प्रकारचा ताप व्यक्तीला येतो . परंतु सुरुवातीच्या काळामध्ये असे काही लक्षणे आढळून येतात जे पुढील प्रमाणे आहेत. >>सुरुवातीच्या काळामध्ये हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना मुख्यत्वे सांध्यांमध्ये जास्त होतात, याचबरोबर डोकेदुखी देखील वाढते.रुग्णाला थंडी वाजून येते व त्यानंतर तीव्र असा ताप येतो. हा ताप पाच-सहा दिवस असाच कमी जास्त होत राहतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो. >> या व्हायरस ने मुटेशन केल्यामुळे नाक लाल होणे ,नाकावर काळा चट्टा उठणे ,चेहऱ्या वर रॅश येणे हि लक्षणे देखील अढळून येतात . >>हातापायांना सूज येते व खूप वेळा शरीरावरती दाने दाने (Spots) आढळून येतात.या आजाराची लक्षणे कमीत कमी दहा ते बारा दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यानंतर असे लक्षात आले की सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये या आजाराचा खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या पाच सहा दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो. >>तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारात शरीरामधील पाचनक्रिया(Metabolism) खूप कमी होते,त्यामुळे खाल्लेले पचत नाही व त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते. आयुर्वेदिक उपाय >> वरील रुंगांमध्ये ऍलोपथ्य सोबत आयुर्वेदिक उपचार देखील त्वरित सुरु करावे ,त्या मध्ये गुळवेल चा काढा सकाळ ,संध्याकाळ घेणे. ताप आल्यासमहासुदर्शन काढा ३ चमचे सकाळी संध्याकाळ आणि रात्री घेणे . >>सोबत सांधे दुखी चा तीव्र त्रास असल्यास अमृतारिष्ट हे औषध ३-३ चमचे ३ वेळा घेणे. >>सोबत गरम पाण्याच्या पिशवी ने सर्व सांधे शेकून घेणे,आहारामध्ये पचण्यास हलका आहार घेणे . >> या काळामध्ये आराम करणे अपेक्षित आहे, लक्षणांचा तीव्रतेनुसार आयुर्वेदिक तज्ञांकडून सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरु करावे . अशा पद्धतीचे ५०० च्या वर रुग्णांना आम्ही वेदने मधून मुक्त केले आहे https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।।।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई.शाखा- मुंबई- वाशी । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. हेल्पलाइन नं: 779677500094225585099822634478https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

Monsoon and Debilitating Asthma

पावसाळा आणि दमविणारा दमा जेष्ठ महिना संपून आषाढ सुरू झाला की पावसाळी वातावरण रंगू लागतं. आषाढातल्या भरून आलेल्या ढगांबरोबर कवि-कल्पना जुळू लागतात. पण डॉक्टरांना मात्र या ढगांबरोबरच अनेक आजारांच्या सूचना मिळतात. अलर्जी /दमा भरून आलेलं आभाळ म्हणजे दमेकऱ्यांसाठी संकटच असतं. श्वास घेताना कोंडल्यासारखं वाटणं, धाप लागणं, छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं, ताप येणं, थकवा येणं असे त्रास होऊ शकतात. मुलांना बाळदमा असेल तर असे त्रास जास्त सतावतात. घरगुती उपाययोजना आरोग्यसंस्कृती दम्याचा त्रास असताना नेब्युलायझर, पंप, औषधाचा वाफारा, श्वासनलिका विस्फारक औषधं आदी नेहमीची उपाययोजना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढील काही उपाय रुग्णाला बरं वाटण्यासाठी करता येतात. १. एक वाटी तेल (तीळाचं) कोमट करून त्यात सैंधव मीठ घालावं. सैंधव मीठयुक्त अशा या तेलाने छातीला फासळ्यांच्या दिशेने हळूवारपणे मसाज करावा. तवा गरम करून त्यावर फडका ठेवावा आणि या गरम फडक्याने छाती शेकावी. यामुळे छातीतला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. २. गरम पाण्याची वाफ घेणं. साध्या गरम पाण्याच्या वाफेने साठलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. विशेषतः मुलांना कफ किंवा सर्दी झाल्यास एका मोठ्या भांड्यात उकळलेले पाणी घ्यावं. ते भांडं उंच बादलीच्या तळाशी ठेवावं आणि मुलांना बादलीच्या तोंडाजवळ पोहोचणारी वाफ घ्यायला प्रोत्साहित करावं. मुलाच्या नाकातून पाणी येऊ लागतं. सर्दी वाहून जाते आणि दम्यापर्यंत जाण्याची शक्यता कमी होते. कफ दाटणं तसंच सुकून जाणं यामुळे दम लागणं वाढू शकतं. त्याचीसुद्धा विशेष काळजी घ्यावी. ३. ‘दम’ लागल्यावर काय करावं? श्वासाचा दमा किंवा झाल्यावर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. या दम्याच्या तडाख्यामुळे रात्री झोप येत नाही. त्यामुळे विशेषतः आडवं झोपणं शक्य होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी बसून काढाव्या लागतात.पहाटे अस्वस्थता वाढते. रात्रीच्या रात्री मग अक्षरशः अशावेळी उशी समोर ठेवून त्यावर डोकं ठेवून विश्रांती घ्यावी. संपूर्ण आडवं न होता छाती, डोळे वरच्या बाजूला करून थोडी आरामदायक अवस्था येऊ शकते. खाणं-पिणं पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. खाण्यात पचण्यासाठी जड पदार्थ टाळावेत. सुंठ, मिरी, पिंपळी, दालचिनी आदी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. कुळीथ पिठाचं पिठलं, हिरव्या मुगाचं वरण, शेवग्याच्या शेंगांची आमटी, मिक्स पिठांची भाकरी, कोवळ्या मुळ्याचे किसून केलेले पराठे, वेगवेगळ्या फळभाज्यांचे सूप या गोष्टी जेवणात समाविष्ट करायला हव्या. तसंच फ्रीजमधले थंड पदार्थ, दही, तळलेले तसंच मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ आणि ज्या पदार्थांची अॅलर्जी आहेत असे पदार्थ टाळावेत. घरामधल्या वातावरणात बदल –दमट वातावरणात दमवणाऱ्या दम्याचा हल्ला होतो. निसर्गातलं वातावरण आपल्याला बदलता येत नसलं तरी घरामधलं वातावरण मात्र नक्कीच बदलू शकतो. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. १. घरातल्या एसीसारख्या विद्युत उपकरणांची योग्य ती निगा राखावी.पावसाळयात AC वापरू नये. २. दम्याच्या रुग्णांच्या उशीचे कवर रोज बदलावेत. ३. पावसाच्या पाण्यामुळे घरात कुठे गळती होत असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. ४. घरात भिंतींना ओल येत असेल तर दमटपणा वाढून दम्याचा त्रास वाढू शकतो. यासाठी या ओल येण्याला प्रतिबंध करावा. ५. गुग्गुळ-राळ-वेखंड-अगरु इ.पदार्थ जाळून धूपन करावं. पावसाळ्यात केलेलं धूपन अनेक आजारांना प्रतिबंध करतं. ६. उदबत्ती किंवा इतर तत्सम सुगंधांची काहीजणांना (धुळ,धुर) अॅलर्जी असते. तरी अशा गोष्टींचा वापर प्रकर्षाने टाळावा. ७. पाळीव प्राणी, विशेषतः मांजरांच्या अंगावरचे केस दमेकऱ्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणं केव्हाही उत्तम! ८. पावसाच्या पाण्यात भिजणं आणि नंतर केस ओले राहणं यामुळं दमा उफाळू शकतो. ते टाळावं. वमन दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी आयुर्वेद पंचकर्म तज्ज्ञांच्या सहाय्यांने वमन करून घ्यावं. त्यामुळे सर्दी, खोकला, अॅलर्जी, ताप, दमा या त्रासांना प्रतिबंध होतो. बस्तिऔषधी तेलाचे व औषधी काढयाचे हे शरीरातील वात व कफ कमी करुन दम्याचा त्रासकमी करु शकतो. ज्यांना हा त्रास होतो त्यांनीबस्ति चिकित्सा करावी व ज्यांना हा त्रास होत नाही त्यांनीही भविष्यात त्रास होऊ नये म्हणून बस्ति करावी. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी पावसाळ्यातील आजार नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते. परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो. तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते. आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा. तसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्लपिल यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात. योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते. या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे, काय खावे, कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियांचे कसे संरक्षण करावे. *हे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी. * 1. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. 2. पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. 3. रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत. 4. दूषित हवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळाचा धूर करावा. 5. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. अतिसार, मलेरिया, गोवर, कांजिण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये वाढलेले दिसते. हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सितोपलादी चूर्ण, अरविंदासव, महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत. हे लक्षात ठेवा 1. दररोज सर्वांगाला तिळाचे तेल कोमट करून मसाज करणे, व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे. 2. गाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. 3. पावसाळ्यात तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न, फास्ट फूड आरोग्यास हानिकारक आहेत. 4. फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात. 5. गुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. उदा. दूध +फळे, मिल्कशेक, दूध व मासे,मांसाहारानंतर आईस क्रीम.इ. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? महिला आणि आरोग्य

blog

महाराष्ट्रियन जेवण एक संतूलित आहार

महाराष्ट्रियन जेवण एक संतूलित आहार चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टि असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत, पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे.  तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे.##.. आपल्याला जेवणातून,पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत…. आणि.. आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड(सहा) रस मिळायला हवेत,तर ते परिपूर्ण जेवण असतं## आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणांतील डाळ प्रोटिन्सची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो….. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते.## वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता देऊन आतडे नरम ठेवते. आणि अन्न पचवण्यास मदत करते… वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात.## थाळीतले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड,पंचामृत,मिरचीचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.## … लिंबू – Vit C ची.पूर्ती करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते… जंतूनाशक म्हणून..## पंचामृतातले तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते. आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणार्या पदार्थाचा उपयोग ठरतो….. मिठ मात्र चवीचे खायचे..## मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात. तर मसाले सर्दि, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात…. पापडातला उडिद बळ देतो,ताकद देतो…. वाटीतला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते..…. ## पातळभाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला… हिंग..अन्नाचे पचन करण्यास मदत करतो… सोबत.. मेतकूट म्हणजे अनेक डाळींचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते.## . आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस, हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते.## मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कँलशिअमसहित,, अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावीत म्हणून। ( कात, चूना, सुपारि, लवंग, वेलचि, खोबरे, गुलकंद,) असे अनेक पदार्थ घातलेला ,, त्रयोदशगुणि,, विडा हा हवाच खायला !!! …## अन्न हे परब्रम्ह, उदरभरण नव्हे हे जाणिजे यज्ञकर्म,…..🌾🌾🍀🌾 * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

महिला आणि आरोग्य

महिला आणि आरोग्य महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते,ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयी आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय कारणानुसार वीस ते तीस वर्षं हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते सहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागत होते. घरगुती बाळंतपणात कधी मातेचा जीव जात असे.आता शस्त्रक्रिया मध्ये रक्तस्राव झाला तर रक्त पुरवण्याची सोय असल्याने माता मध्ये माता मृत्यु व बाल मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे. आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सरचा धोका आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत. स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी आरोग्यविषयक उपक्रम जागरुकपणे राबविल्यास अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. महिलांचा आहार सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात देखील बाहेर येत नाहीये. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. त्याला भूक लागलेली असते आणि तिला काम ही करायच असतं.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर दुध घेणे किंवा DryFruits खाल्ले पाहिजे आणि चहा हा त्यावरचे उत्तर नाहीच,यामुळे भूक याची भावना विसरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो.सकाळी लवकर नाष्टा केला तर दिवसभरात अचानक भूक कमी लागते व पित्त होणे या गोष्टीचा त्रास होत नाही. नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड,बिस्कीट वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाल्ल्यास उत्तम. दुपारच्या जेवणामध्ये भात,वरण,भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या,डाळी उसळी,ताक,दही अशा पदार्थांचा समावेश असू द्या.मुले नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वतःसाठी स्वयंपाक करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ सोडल्यास आपले दैनंदिन पोषण मुल्यांची गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. संध्याकाळी चिप्स,चिवडा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या,गुळशेंगदाणे,फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे.रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा.त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ, खाणे टाळावे.अंडी,मासे करण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते.आपला आहार हे आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घेतली पाहिजे. योग आणि महिला महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या,पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.महिला कुटुंबाविषयी नितांत समर्पणाची जबाबदारी पार पाडतात. पण हे सर्व करताना पुरेश्या व्यायामाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात.आरोग्याच्या तक्रारी वाढतात.अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा होणे,राग येणे सुरू होते.मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून जाते.त्यामध्ये डिप्रेशन येते, मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी जो वैद्यकीय खर्च करावा लागतो तो निराळाच.पण मग हे सर्व टाळू शकत नाही का? तर नक्कीच टाळू शकतात.यासाठी महिलांनी थोडा स्वार्थी होणे गरजेचं असतं त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा,चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा ते एक तास योगा केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात. वाढते वजन नियंत्रणात येते.सांध्यांचा त्रास, गुडघेदुखी,श्वसनाचे विकार बरे होतात. वाढते शुगर, कोलेस्ट्रॉल,गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इनबॅलन्सने सुरू होतात. योगा तर ह्या सर्वांच्या मुळावर घाव घालत असल्याने या समस्या सराईतपणे बऱ्या होतात.आसन,प्राणायाम,सूर्यनमस्कार, व्यायाम केल्याने मात्र महिला चांगले घरकाम करू शकतात.म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-411044 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Home Remedies

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय रोज काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे,परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात,तसेच हार्मोनचे असंतुल.बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते. केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. १ :-* कढीपत्ता:- हा भारतीय स्वयंपाक घरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन,प्रथिने, लोह,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो.केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्या व्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मास देखील बनवून लावू शकता. १) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क:-कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा. २) कढीपत्ता कांदा हेअर मास्क:-केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता . ३) कढीपत्त्याचे तेल:-कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे.त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अहळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे.आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेल. केस गळण्याची कारणे 1) – शरीरात IRON कमी होणे.शरीरात Calcium कमी होणे. 2) दररोज डोक्यावरुन अंघोळ करणे. 3) केसांसाठी जास्त shampoo किंवा chemical products जास्त वापरणे. उपाय – 1) आहारात Iron आणि Calcium युक्त पदार्थ घेणे, जसे- खजुर,मनुका, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा आहारात समावेश असावा. 2 ) केस आठवडयातून 2 वेळा धूणे व केसांचे तेल दररोज रात्री लावणे. 3 ) केस बाहेर जाताना बांधणे त्याने केस खराब होत नाहीत व प्रदूषणाचा बाईट परिणाम होत नाही.धन्यवाद!!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles मूळव्याध वर घरगुती उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Scroll to Top