infertilityayurved

December 2021

blog

अपुरी झोप व आयुर्वेद

अपुरी झोप व आयुर्वेद नियमित व पुरेशी झोप न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नैराश्य व निद्रानाश यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याने पुरेशी झोप घ्यावी.झोप सातत्याने कमी होत असणारे 30% लोकांना दीर्घ कालीन गंभीर आजार होतात.उदा. हृदयरोग,हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे,मधुमेह,उच्चरक्तदाबई.पुरेशी झोप न मिळाल्यास काम करताना निर्णय क्षमता कमी होते. नेहमी रात्री जागरण होत असेल तरचेहरा निस्तेज होतो, त्वचा सुरकुतलेलीदिसते, डोळ्यांखालील काळे वर्तुळ, काळी त्वचा व चेह-यावर – कायमस्वरूपी सुरकुत्या असे बदल होऊन व्यक्ती प्रौढ किंवा वृद्ध/वयस्कर दिसू लागते. योग्य वेळी झोपेचा अभाव असलेल्या पुरुष व स्रीयांमध्ये कामवासना कमी होणे, लैंगिक संबंधातील रस कमी होणे या गोष्टी आढळतात. त्यांच्या शरीरातील टॅस्टोस्टेरॉन (TESTESTERON) ची पातळी कमी होते.झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होते, ज्यामुळे वारंवार विस्मरण होते. उपाय : पुरेशी झोप होण्यासाठी आपली दिनचर्या चांगली असावी. सकाळी लवकर उठून योग्य प्रमाणात व्यायाम करावा.पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा.संध्याकाळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी करावे.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा. झोपताना मधुर व मनाला आवडेल असे संगीत ऐकावे, रात्री झोपताना केसांच्या (SCALP) मुळाशी ब्राम्ही तेलाने मसाज करावे. रात्री झोपताना तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावे व त्याला शतधौत घृत या औषधीचा मलम लावून तळपायांना मसाज करावे. रात्री झोपताना म्हशीचे दूध १ कप + १ चमचा खसखस एकत्र करून पिणे. यामुळे झोप नियमित होते. रात्री झोपताना घरातील जायफळ उगाळावे. उगाळलेले १चमचा जायफळ चाटून घ्यावे. याने देखील झोप पूर्ण होते. अशाप्रकारे पूरेशी झोप घ्यावी व आपले आरोग्य जपावे. धन्यवाद !   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाण्याचे फायदे “ओवा“स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते.याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा.ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो.आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.यासोबतच उचकी,ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते. 1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या. 2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही. 3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील. 4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील. 5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल. 6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल. 7. तोंडले,ओवा,अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या.एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा,सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल. 8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल. 9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतील. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल. 10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल. 11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल. 14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा. 15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या. 16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल. 17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल. 18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल. 19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासुन आराम मिळेल. 20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल. 21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 22. 1 ग्रॅम भाजलेल्या ओवा पानामध्ये टाकुन चावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा. 23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या.मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल.झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल. 25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.धन्यवाद!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

blog

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे आपल्या जेवणात चवीसाठी आंबटपणा येण्यासाठीचे काम आमसूल करते.हे चिंचे ईतकेच महत्व असलेले औषध आहे.. म्हणून प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात असायलाच पाहिजे.आमसूलात लोह,कँलशिअम,फाँस्फरस,प्रथिने, फायबर व क,, जीवनसत्व असतं. आयुर्वेदाप्रमाणे कोकम, हे पित्तशामक,दिपक,पाचक, व ग्राहि गुणधर्माचे आहे.कोकमची साल, स्तंभन,म्हणजेच थांबवण्याचे काम करते, जसे आंव,जुलाब,उलटी 🌟⭐️*.. आमसूलाच्या बीचे तेल काढतात,त्यालाच आमसूलाचे तूप म्हणतात. कोकम पाण्यांत टाकून काढा, पिल्यास,अपचन दूर होते पचनसंस्था उत्तम काम करते.आमसूलात पाणी टाकून कोळ करावा, त्यांत वेलचि, खडिसाखर,टाकून सरबत करावे,हे प्यायल्याने, आम्लपित्त,दाह, तृष्णा,उष्णतेचे विकार दूर होतात.🌟⭐️.. कोकम गर, नारळ दूध,कोथिंबिर, व ताक टाकून सोलकढी पिल्यास, अन्नाचे निट पचन होते.अतिसार, संग्रहणि, रक्ताचे जुलाब, मुरडा हे सर्व कोकम गराचे सरबत घेतल्याने बरे होतात.पोटात कळ येऊन आंव पडत असेल तर, कोकमचे तेल भातात कालवून खावे, 🌟⭐️.. अंगावर पित्त उठले असल्यास, कोकम भिजवलेले पाणी सर्व अंगास लावावे हातापायाची उष्णतेमुळे आग होत असल्यास कोकम उकळलेले तेल लावावे. दाह कमी होतो.हिवाळ्यातील थंडीमुळे ओठ फुटत असतील तर कोकम तेल गरम करून लावावे.ओठ मऊ पडतात. 🌟⭐️.. हिवाळ्यांत शरीराची त्वचा कोरडी पडून भेगा पडतात.तिथे कोकम तेल लावावे.रोजच्या कोकम वापरामुळे आतडी मजबुत होतात.मूळव्याध असल्यास दह्यावरच्या निवळीत कोकम कल्क मिसळून प्यावे,रक्त येणे बंद होते. 🌟⭐️. उन्हाळ्यांत बाहेर पडण्याच्या आधी, कोकम सरबत प्यावे.ऊन बाधत नाही..वजन कमी करण्यासाठी ४०० ग्रँम कोकममध्ये ४ लिटर पाणी घालून उकळावे व एक लिटर करावे. मग सकाळ, संध्याकाळ १०० ml. प्यावे.. वजन कमी होते.. 🌟⭐️.. यांत व्हिटँमिन सी. विपुल आहे.. पोटँशिअम, मँग्नेशिअम खूप असल्याने ह्रदयविकार होत नाहीब्लडप्रेशर नाँर्मल राहतं.सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग,कंठरोग याच्या नियमित सेवनाने बरे होतात. 🌟⭐️.. रोजच्या आहारात कोकमचा वापर जर कायम ठेवला तर,अग्निमांद्य, अपचन,अरूचि,पोट तडिस लागणे हे विकार होत नाहीत…🌟⭐️🌟⭐️🌟…. *आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Home Remedies

मूळव्याध वर घरगुती उपाय

मूळव्याध वर घरगुती उपाय मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. होऊ नये म्हणून काय करायला हवेभरपूर पाणी, दररोज व्यायाम, शौचास जोर न करणे, एका जागी जास्त वेळ न बसणे, नेहमी वजनदार गोष्टी न उचलणे या गोष्टी पाळल्या तर मूळव्याध होणे टाळता येते. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेवणाच्या वेळा नियमित ठेवा, अतिरिक्त वजन कमी करा, मसालेदार पदार्थ, मांसाहार व अतियोग टाळा, मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, रात्रीचे जागरण टाळा म्हणजे मूळव्याधीपासून दूर राहता येईल. आहारात तंतूंचा भरपूर समावेश व मल नरम राहील अशी योजना आवश्‍यक असते. आहार :-हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.) रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. सुरणाची भाजी आठवड्यात एकदा तरी खावी,जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा. जेवणात तांदूळ, गहु,यव,ज्वारी,दूधी,पडवळ,आंबटचुका,घोसाळी,मुग,तुर,सुंठ, मनूका, आवळा याचा वापर करा. हे खाऊ नका मका,उडीद,वाल,पावटे,शेंगदाणे,तळलेले पदार्थ,लोणची ,पापड, मास विशेषतः बीफ रेड मीट सेवन टाळा.घरगुती उपाययोजना◆रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.◆इसबगोल सकाळी भीजत ठेवून रात्री ते पाणी प्यावे.◆कोरफड व लिंबू रस एकत्रित लावल्यास तात्काळ रक्त थांबेल.उपडे झोपून हे मिश्रण आत सरकवावे.◆कासिसादी तेलाचा बोळा भिजून या जागेत ठेवा.◆दोन चमचे दुर्वा रस कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.◆डाळींबाच्या सालीचे चुर्ण एक तास भीजत घालून नंतर ताक व जीरपूड+ सैधव घालून रोज प्या.◆मुळ्याच्या रसात लिंबू व सैधव घालून प्या.◆चमचाभर जीरेपूड, धनेपावडर, ओवा अर्क,बडीशेप अर्क चमचाभर व पिव्वर गुलकंद ग्लासभर पाण्यात घालून प्या.◆चमचाभर लोण्यात नागकेशर चुर्ण टाकून दोन-तीन वेळा घ्या.◆कोरफड गर व चमचाभर मध,चमचाभर दुर्वाचा रस व तूप,एरंडेल यांचे क्रीम तयार करुन त्या जागेवर लावा.वरती कापूस लावा.थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,म्हणजे छान मलम तयार होईल.◆मोड दुखत असेल तर,सुजला असेल,बाहेर आला असेल तर,विस्तवावर खारकेचे चुर्ण टाकून ती वाफ घ्या.मुळव्याध नियंत्रणासाठी अस्तित्वात असलेल्या उपचार पध्दती.◆मूळव्याधीच्या मुळाशी छेद घेऊन काढून टाकले जाते. यालाच हिमोरायडेक्‍टॉनी म्हणतात.◆मूळव्याधीचे कोंब स्टेपलर गनमध्ये घेऊन गन शूट केली जाते. या सर्जरीमध्ये मूळव्याध कट होण्याचे व स्टेपल होण्याचे कार्य एकाच वेळी होते.◆मूळव्याधीच्या ठिकाणी स्क्‍लेरोसंट इंजेक्‍शन टोचले जाते. वेदनाविरहित उपचार पद्धती आहे. रुग्णास ॲडमिट राहावे लागत नाही व मूळव्याधीमधील रक्तस्राव ट्रीटमेंटनंतर एक-दोन दिवसांत बंद होतो.◆डॉपलर गाइडेड हिमोराईड (मूळव्याध) आर्टरी (रक्तवाहिनी) लायगेशन (बांधणे) या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा बंद केला जातो.◆मूळव्याधीच्या कोंबावर लेझर किरणांचा मारा करून रक्तवाहिन्या गोठवल्या जातात. यामुळे मूळव्याधीमधील रक्तस्राव बंद होतो◆या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तस्राव बंद करण्यासाठी मूळव्याधीच्या कोंबांना नायट्रस ऑक्‍साइड वायूचा वापर करून गोठविले जाते यालाच फ्रायोसर्जरी असे म्हणतात.◆पाइल्स गनद्वारा मूळव्याधीच्या मुळाशी रबरबॅंड लायगेशन करुन रबरबँड बसविला जातो. मूळव्याधीच्या कोंबाचा रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते.◆मूळव्याधीच्या मुळाशी क्षारसूत्र बांधले जाते. या चिकित्सेमध्येही रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते. भगंदर या व्याधीमध्ये क्षारसूत्र चिकित्सेचा विशेष फायदा होतो. या उपचार पद्धतीनंतर भगंदर पुन्हा उद्‌भवण्याचे प्रमाण नगण्य आहे.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Home Remedies

वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी. *चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे. कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा. खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे. *सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे. *आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा. ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे. *तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा. भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही. नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते. * जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट, चॉकलेट इत्यादी बंद करावे. देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) , देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) , ताक (दुपारी जेवताना) घ्यावे. * ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको. *मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग, काळ्या मनुका (black resins), जर्दाळू (apricot),खारीक, लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे. *पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा. * ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे. नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे . *जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या. *आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते. पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत. सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Visit- https://infertilityayurved.in/  

Scroll to Top